नरेंद्र मोदी की उद्धव ठाकरे? महाराष्ट्र कुणाच्या कामगिरीवर अधिक समाधानी

0

मुंबई : केंद्र सरकारबरोबरच देशातील राज्यांमधील सरकारांची करोना संकटकाळात तसेच त्यांची एकंदरीत कामगिरी कशी होती याबाबत जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेने केलेले मूल्यमापन पाहण्यासारखे आहे एबीपी न्यूज आणि सीव्होटरने ही पाहणी केली. या पाहणीनुसार राज्यातील सरासरी ५८ टक्के लोकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. त्याच बरोबर राज्यातील सरासरी ४७ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. देशाचा विचार करायचा झाल्यास देशातील सरासरी ६६ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे.

आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर किती समाधानी आहात असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला होता. त्यावर ४६ टक्के लोकांनी आपण अतिशय समाधानी असल्याचे म्हटले आहे. तसेच ३२ टक्के लोकांनी समाधानी असल्याचे, तर २० टक्के लोकांन असमाधानी असल्याचे सांगितले आहे. हे पाहता सरासरी ५८ टक्के लोक राज्यातील सरकारच्या कामगिरीवर खुश दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीवर ४८ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर २५ टक्के लोक समाधानी, तसेच २६ टक्के लोक असमाधानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे पाहता सरासरी ४७ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:19 PM 16-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here