कोरोना लसीकरणाला जिल्ह्यात पुन्हा सुरुवात, २४५ जणांना लसीकरण

0

रत्नागिरी : कोरोना लसीकरण मोहिमेंतर्गत ‘को-विन’ अॅप पहिल्याच दिवशी ‘डाऊन’ झाल्याने दोन दिवस ही मोहीम थांबवण्यात आली होती. मंगळवारी जिल्ह्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून २४५ जणांना लस देण्यात आली

रत्नागिरी जिल्ह्यात पाच केंद्रावरुन लसीकरण करण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, दोन जिल्हा उप रुग्णालय आणि दोन ग्रामिण रुग्णालय अशी पाच ठिकाणी लस दिली जात आहे. जिल्ह्यात दर दिवशी प्रत्येक ठिकाणी शंभरप्रमाणे 500 आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यात 270 जणांना लस देण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 16 हजार 360 डोस रत्नागिरी जिल्ह्याला पुरवण्यात आलेत. 28 दिवसांच्या अंतराने दुसरा डोस दिला जाणार आहे. एका डोसच्या बाटलीतील 0.05 मिलि या प्रमाणात ही लस दिली जातेय. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात 23जणांना लस देण्यात आली. गुहागर ग्रामीण रुग्णालय 79, दापोली उपजिल्हा रुग्णालय 32, कामथे उपजिल्हा रुग्णालय 69, राजापूर ग्रामीण रुग्णालयात 42जणांना लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले व लसीकरण मोहीमेचे प्रमुख डॉ. चंद्रकांत शेरखाने यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:08 AM 20-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here