सरपंच आरक्षण सोडतीकडे लक्ष

0

रत्नागिरी : सरपंच आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले असून जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावर २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. आरक्षणाची सोडत होणार आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक झाल्याने निकालाची अधिसूचना २१ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. सरपंच व उपसरपंच यांची निवड निवडणूकीनंतर ३० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश ग्रामपंचायत विभागाने दिले आहेत. त्यानुसार २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तालुक्याच्या मुख्यालय ठिकाणी ही सोडत होणार आहे. सरपंच आरक्षण कार्यक्रमाबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत पुनर्वसन यांनी दिलेल्या सूचनांनुसार कोव्हिड-१९ प्रतिबंधक उपाय पाळून ही सोडत होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:09 AM 21-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here