रत्नागिरी : पहिल्या टप्प्यात कोरोना लस घेण्यासाठी जिल्ह्यात प्रतिसाद कमी मिळाला होता. त्यानंतर मंगळवारी (दि. 19) झालेल्या दुसऱ्या टप्प्यातही 59 टक्केच लाभार्थ्यांनी लस घेतली. गंभीर आजाराची कारणे देत अनेकांनी लस घेण्यास नकार दिल्याचे पुढे येत आहेत. पाच केंद्रांवर पाचशे जणांना लस दिली जाणार होती; मात्र अवघ्या 291 जणांनी लस घेतली. अजुनही लसीबाबत संभ्रमावस्था असल्यामुळेच हा प्रतिसाद कमी मिळत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:27 AM 21-Jan-21