मुंबई : धनंजय मुंडेंविरोधात आरोप करणाऱ्या रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपत्ती आणि धनंजय मुंडे संतती लपवतात, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. तसेच तक्रार करणाऱ्या महिलेवर ठाकरे आणि पवार यांनी दबाव टाकला. महाराष्ट्रात ठाकरे आणि पवारांचा एवढा दबाव आहे की, कोणाही विरोधात बोलू शकत नाही. माझाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता, असंही किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:45 PM 22-Jan-21