निवळीतील ग्रामस्थांचे २६ जानेवारीला उपोषण

0

रत्नागिरी : एमआयडीसीच्या निवळी येथील धरणामध्ये होणाऱ्या पाणी साठ्यामुळे शेतीचे नुकसान होत असून दरवर्षी अधिकारी वर्गाकडून ग्रामस्थांची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे रवळनाथ ग्रामविकास पॅनलच्यावतीने २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवळी गावच्या हद्दीत बावनदीवर एमआयडीसीचे धरण आहे. पावसाळ्यानंतर दरवर्षी पाणी अडवण्यात येते. मात्र त्यामुळे पाण्याचा मोठा साठा होऊन शेतजमीन पाण्याखाली जाते. त्यामुळे हिवाळ्यात भाजीपाला व अन्य पिके शेतकऱ्यांना
घेता येत नाहीत. याबाबत वारंवार एमआयडीसी अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत. मात्र प्रत्येक वेळी तोंडी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येते. त्यामुळे रवळनाथ ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या बाबतचे निवेदन संजय निवळकर, सुभाष मालप, सौ. आसावरी कीर, सौ. संजना पवार यांनी दिले आहे. या निवेदनाची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:18 AM 23-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here