समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले!

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील गणपतीपुळे, आरे वारे, गुहागर, रत्नागिरी येथील किनारे पर्यटकांनी फुलले आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेल्या मालवण, किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासह तालुक्यातील विविध धार्मिक तसेच पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. बीकेंडमुळे सलग सुट्या असल्याने पर्यटकांनी मालवण शहराला पसंती दर्शविली आहे. त्यामुळे मालवण तालुक्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. मालवण तारकली-देवबाग येथील पर्यटनस्थळे तसेच बहुसंख्य हॉटेलमधील बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला पर्यटन तेजीत असून आर्थिक उलाढालही वाढली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:06 AM 25-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here