रत्नागिरी : शासनाने २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अटी व नियम पाळून या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. शिक्षकांना कोरोना चाचणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणीची कोणतीच सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. एखादा विद्यार्थी जर कोरोना पॉझिटिव्ह सापडला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचीही कोरोना चाचणी करण्यात यावी, असे मत पालकांनी व्यक्त केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:44 AM 26-Jan-21