रत्नागिरी : कोरोनाच्या काळात नियोजनाचा निधी प्राधान्याने कोरोनासाठी खर्च झाला. मात्र आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे येत्या काळात संपूर्ण निधी देऊन रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यात येतील. त्यात रस्ते आणि पर्यटनाला अधिक असेल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली. ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचा रत्नागिरी जिल्ह्याचा मुख्य शासकीय सोहळा आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पार पडला. ध्वजवंदनानंतर ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:27 PM 26-Jan-21