इस्लामपूर : राज्य सरकारकडे असंघटित कामगारांचे साडेआठ हजार कोटी रुपये पडून असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. कोरोना महामारीच्या नावाखाली सरकार प्रश्न सोडवण्यात चालढकल करीत आहे, अशी टीका येथे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ आणि रयत क्रांती संघटनेची कामगार आघाडी यांच्यातर्फे आयोजित असंघटित कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. योवळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. पाटील म्हणाले, केंद्र सरकारकडून शेतकरी, कामगार यांच्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र, कोरोनाच्या नावाखाली राज्यात विकासकामे ठप्प आहेत
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:16 PM 28-Jan-21