रत्नागिरी : शहरात होणारी हेल्मेट सक्ती दुचाकी वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक पोलिसांकडून कोणतेही सौजन्य दाखविले जात नाही. लोकप्रतिनिधींनाही जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते. नागरिकांमध्ये या सक्तीमुळे असंतोष आहे. वाहतूक निरीक्षक किंवा पोलिस अधीक्षकांना भेटून ही सक्ती मागे घ्यावी, अशी विनंती करू, अन्यथा पालिकेच्या गाळ्यामध्ये नाममात्र भाडेतत्त्वावर असलेला वाहतूक पोलिसांच्या कार्यालयाचा करार रद्द करू, असा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शुक्रवारी भाजपचे नगरसेवक राजू तोडणकर यांनी हा विषय उचलून धरला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:13 PM 30-Jan-21