रत्नागिरी : कोरोनाच्या भितीमधून आता पर्यटक पूर्णतः सावरले आहेत. त्यामुळे नऊ महिने ठप्प राहीलेल्या पर्यटन व्यावसायिकांना डिसेंबर, जानेवारी महिन्याला दिलासा मिळाला. जानेवारीच्या अखेरीस आलेल्या संकष्टी चतुर्थीला गेल्या दहा महिन्यातील उच्चांकी गर्दी गणपतीपुळेत झाली होती. दुपारपर्यंत साडेआठ हजाराहून अधिक भक्तगणांनी दर्शन घेतले. शनिवार, रविवार जोडून आलेल्या सुट्ट्या पथ्थ्यावर पडल्या आहेत. कोरोनावरील लस दाखल झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुपही फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:33 PM 01-Feb-21