मुंबई : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. शिवसेनेनं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा कृषी कायद्याविरोधात आक्रमक भूमिका मांडली आहे. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करून गाझीपुर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना आज भेटणार असल्याची माहिती दिली आहे. ‘महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले. शेतकऱ्यांची तडफड व अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे’ अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:21 AM 02-Feb-21