‘दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; मात्र मुंबईतील मराठा आंदोलनाकडे शरद पवारांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष’

0

पुणे : देशभरात शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला सरकारने पाठिंबा दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील पाठिंबा दिला. मात्र आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडे पवारांनी पाहिले सुद्धा नाही. त्यांनी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पवारांना याची जाणीव नाही. असली तरी ते दुर्लक्ष करत आहेत.काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी देखील याबाबत कोणत्याही प्रकारे भूमिका घेतली नाही.त्यामुळे मराठा समाजाला संघर्ष करावा लागत आहे, अशी टीका मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कुंजीर यांनी केली आहे. पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मोर्चाचे राजेंद्र कोंढरे, रघुनाथ चित्रे पाटील,नाना निवंगुने, हनुमंत मोटे, अनिल ताडगे, धनंजय जाधव, मीना जाधव, गणेश मापारी, जगजीवन काळे, जितेंद्र कोंढरे , महेश टिवे आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:30 PM 02-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here