मुंबई : पुण्यात एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदूंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का?, भाजपने आंदोलन केल्यावर एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र अटक झाली नाही, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. या जिहादी भामट्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला नाही?, मुळात भामट्यांची गर्दी असलेल्या चिथावणीखोर एल्गार परिषदेला परवानगी का दिली?, असा सवालही भातखळकरांनी राज्य सरकारला केला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:14 PM 03-Feb-21