रत्नागिरी : भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले, त्या माणसाबद्दल बोलायला नको, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. आपल्या शपथविधीला येणारा माणूस, शपथविधीला येतो, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो. आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघून जातो, त्याच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे धरून शरद पवार साहेबांसोबत उभं केलं जाते, तोच माणूस भाजपावर टीका करतो आणि आपण सहन करायची का, असा सवाल उपस्थित करत माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:12 PM 03-Feb-21