पुणे : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याची चर्चा रंगली होती. पण, ‘हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे, आमच्या कुणाचीही नाराजी नाही’, असं राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यांनी जर अधिवेशन झाल्यानंतर राजीनामा दिला असता तर अधिक बरे झाले असते. त्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:27 AM 05-Feb-21