दूध संस्थांच्या थकीत बिलांसाठी १ कोटी, शेतकऱ्यांना दिलासा

0

लांजा : जिल्ह्यातील शासकीय दूध योजनेसाठी दूध संकलन करणाऱ्या जिल्ह्यातील सहकारी दूध संस्थांचे गेले चार ते पाच महिन्यांपासूनचे बिले थकीत राहिल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. या गंभीर विषयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस अजित यशवंतराव यांनी गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तातडीचा पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी थकीत रकमेपैकी १ कोटी ९लाख रुपयांच्या निधीची तरतूद पहिल्या टप्प्यात झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील दूध शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:22 PM 15-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here