पुद्दुचेरी : पुद्दुचेरीतील राजकारणानं वेगळं वळण घेतलं असतानाच अचानक किरण बेदींची नायब राज्यपाल पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार तेलंगणाचे राज्यपाल तिमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आता या विषयावर किरण बेदी पहिल्यांदाच बोलल्या आहेत. किरण बेदींनी आपल्या सोशल मीडियावरुन एक पत्र शेअर करत आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी भारत सरकारची ऋणी आहे. मी त्या सर्वाचे आभार मानते ज्यांनी या काळात माझ्यासोबत काम केलं.” किरण बेदींनी पुढं लिहलंय की, “मी नायब राज्यपाल म्हणून जे काही केलं ते त्यागाच्या भावनेनं केलं, नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी पार पाडली. मी पूर्ण विश्वासाने सांगू शकते की या कार्यकाळात मी राज निवास टीमसोबत पूर्ण निष्ठेनं जनहितासाठी काम केलं आहे. पुद्दुचेरीचं भविष्य उज्ज्वल आहे.”
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:59 PM 17-Feb-21