मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 5427 नवे रुग्ण वाढले आहेत. तर 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात 2543 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
सध्या राज्यात 2,16,908 व्यक्ती होमक्वांरटाईन असून 1743 लोकं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.48 टक्के इतका आहे. तर रिकव्हरी रेट 95.5 टक्के झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20,81,520 झाली आहे. तर 40,858 रुग्ण अजूनही राज्यात एक्टीव्ह आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:05 AM 19-Feb-21