”राजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत”

0

सांगली : महाविकास आघाडीमधील जवळपास 56 टक्के मंत्री कोरोनाने बाधित झाले आहेत तर आणखीही 4 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र दुसरीकडे अजूनही काही राजकीय मंडळी कोरोनाला हलक्यात घेत सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता मेळावे, सभा घेत आहेत. याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कोरोनाचे नियम पाळण्यामध्ये ‘आमचे चुकतंय’ अशी प्रांजळपणे कबुली दिली आहे. दुर्दैवाने आम्ही ना सोशल डिस्टन्स पाळतोय ना पूर्णवेळ मास्क लावत नाही.. खरं तर ही आमची मोठी चूक आहे.. आणि ही चूक आम्ही केली नाही पाहिजे, अशी कबुली विश्वजित कदम यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर नगरपंचायत मधील 3 कोटी 82 लाख रुपयांच्या विकासकांमाचे उदघाटन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर विश्वजित कदम यांनी उत्तर दिलं.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:47 PM 20-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here