सोशल मिडीयावर आ. उदय सामंतांची बदनामी करणाऱ्यांवर पोलीस करणार कडक कारवाई

0

रत्नागिरी : निवडणुकीच्या वेळी सोशल मिडीयाच्या माध्यामतून बदनामी करणाऱ्यांवर आता कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार दिली असून या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. निवडणुका जवळ आल्या की काही समाज कंटक सोशल मीडियाच्या माध्यमातुन नेत्यांची बदनामी करण्यात मोठेपणा समजतात. असाच प्रकार उदय सामंत यांच्या बाबतीत काही समाजकंटानी सुरू केला आहे. मुद्द्यावर बोलण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीची बदनामी करण्यात त्यांना धन्यता वाटते. आ. उदय सामंत यांनी दिलेल्या तक्रारीची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने दाखल घेऊन संबंधितांवर तत्काळ कारवाईचे संकेत दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here