पालीतील पाईपलाईन दोन तासांत पूर्ववत

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर पाली येथे सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे नादुरुस्त झालेली पाईपलाईन दोन तासांत दुरुस्त करण्यात आली असून, पाणीपुरवठा सुरळीत असल्याचे प्रकल्प कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गेले अनेक दिवस रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला. महामार्गाशेजारी भाग मोकळा करून सपाटीकरण सुरू आहे. त्यासाठी मशिनद्वारे खोदाई सुरू केली आहे. हे काम करीत असताना पाली येथे पाणी पुरवठा करणारी वाहिनी नादुरुस्त झाली. ही माहिती ठेकेदार कंपनी प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ वाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दोन तास पाणी पुरवठा खंडीत झाला होता; परंतु त्याचा त्रास स्थानिक ग्रामस्थांना झाला नाही असे चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले. दोन तासात ही वाहिनी पूर्ववत करण्यात आली असून पाणी पुरवठाही सुरळीत झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:26 AM 22-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here