जालगाव : तालुक्यातील टाळसुरे येथील एका ६० वर्षीय व्यक्तीचा बसमधून प्रवास करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दापोली बसस्थानक येथे दुपारी घडली. याबाबत दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या बाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अनंत सखाराम साळवी (रा.टाळसुरे) हे सोमवारी सकाळी ९.३० वा.सुमारास टाळसुरे येथून दापोली येथे बाजारहाटसाठी आले होते. खरेदी झाल्यानंतर ते दापोली बसस्थानकात येऊन त्यांनी दापोली-खेड बस पकडली. मात्र बसमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत दापोली पोलिस ठाण्यात महेंद्र साळवी यांनी खबर दिली. या घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गुजर करीत आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:54 AM 23-Feb-21