रत्नागिरीत एका बोगस फायनान्स कंपनीकडून लाखोंचा गंडा, कर्जाच्या नावाखाली शेकडो महिलांना चुना

0

रत्नागिरी : पाच महिलांचा एक गट करून प्रत्येकी 50 हजार कर्ज देतो, असे सांगत मध्यमवर्गीय महिलांना टार्गेट करून एका बोगस फायनान्स कंपनीने शेकडो महिलांना चुना लावला आहे. महिलांकडून कर्ज देण्यासाठी कंपनीने महिलांकडून पैसे घेतले आहेत; मात्र तीन ते चार महिने झाले तरी कर्जाचा पत्ता नाही. फायनान्स कंपनीचा दिलेला पत्ता बोगस निघाला आहे. अनेक महिला चौकशी करून निराश होऊन परतत आहेत. मध्यमवर्गीय महिलांना गाठून त्यांना सहज कर्ज उपलब्ध करून देण्याचा दावा या कंपन्या करीत आहेत. त्यासाठी पाच महिलांचा एक गट तयार करून प्रत्येक महिलेला 50 हजार याप्रमाणे गटाला अडीच लाख फायनान्स करण्याचे आमिष ही कंपनी दाखवते. काही दिवसात कर्जाचे पैसे आपल्या खात्यात जमा होतील, असे आमिष दाखवले जाते. या कंपनीचे एजंट म्हणून काही महिला राबत आहेत. शहर परिसरातील शेकडो महिलांकडून या कंपनीने कर्ज देण्याच्या नावाखाली प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे लाखो रुपये जमा केल्याची चर्चा आहे. महिलांनी पैसे भरून तीन ते चार महिने झाले तरी कर्जाचा पत्ता नाही. तेव्हा काही महिलांनी या पत्त्यावर जाऊन चौकशी केली तर तेथे कंपनीचे ऑफिसच नाही. पत्ता बोगस असून आपली फसवणूक झाल्यामुळे निराश होऊन परतत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:04 PM 23-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here