ग्रामपंचायत निवडणुका पक्षांच्या चिन्हावर लढवल्या जाव्यात : बाळ माने

0

रत्नागिरी : यापुढे ग्रामपंचायत निवडणुकाही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या पाहिजेत, असे मत माजी आमदार बाळ माने यांनी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच स्वतःचे उमेदवार उभे केले आणि त्याला यशही चांगले मिळाले आहे. मात्र या निवडणुका चिन्हावर लढवल्या जात नसल्याने काही ठिकाणी अडचण होते. सामान्य माणसांपर्यंत केंद्रातील मोदी सरकारच्या योजना पोहोचल्यामुळे त्यांना भारतीय जनता पार्टीचे कमळ माहिती आहे, पण ग्रामपंचायत निवडणुका चिन्हावर लढवता येत नाहीत. त्यामुळे मतदारांची गफलत होते. त्यामुळे काही ठिकाणी आम्ही गाव पॅनल स्तरावर निवडणुका लढवल्या, तर काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवार उभे केले. त्यात चांगलो यश भाजपला जिल्ह्यात मिळालो आहे. मात्र भविष्यातील ग्रामपंचायत निवडणुकासुद्धा राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढवल्या गेल्या पाहिजेत, असं त्यांनी म्हटलं आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:11 PM 23-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here