रत्नागिरी : जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी 22 फेब्रुवारी 2021 रोजीच्या आदेशान्वये जिल्ह्यात रात्रौ 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली होती तथापि आत सदर आदेशामध्ये बदल करुन जिल्ह्यात संचारबंदीची वेळ रात्रौ 10 ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कळविले आहे. सदर आदेश संपुर्ण रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्रात आज दिनांक 24 फेब्रुवारी 2021 पासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहील, असे आदेशात म्हटले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:59 PM 24-Feb-21