साडवली : संगमेश्वर तालुक्यातील निवेबुद्रुक-आडीवाडी येथील मुंबईकर व स्थानिक ग्रामस्थांनी कोणतेही काम मनापासून हाती घेतल्यास त्याला यश नक्कीच मिळते हे दाखवून दिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत वाडीतील १५ स्थानिक व ५५ मुंबईकर चाकरमान्यांनी लॉकडाऊन कालावधीत श्रमदानातून २५ फूट खोल विहीर खोदली. या विहिरीला सध्या सुमारे १० फुटांपर्यंत पाणी असून यामुळे वाडीला दरवर्षी जाणावणारी पाणीटंचाई संपुष्टात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:17 PM 26-Feb-21