‘नरेंद्र मोदींपेक्षाही कितीतरी पटीने शक्तिशाली असलेल्या ब्रिटिशांना आपण या देशातून हाकलले तर मोदी काय चीज आहे, त्यांनाही नागपूरला पाठवू,’ अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर हल्ला चढवला. तिरुवेलनेली येथे शिक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते. ब्रिटिश राजवटीत विरोधकांना जसे चिरडले जात होते तेच काम भाजपच्या राजवटीत सुरू आहे, अशी टीका करतानाच ब्रिटिशांना त्यांच्या देशात परत पाठवले तसेच मोदींनाही लोक पुन्हा नागपूरला पाठवून देतील असे राहुल गांधी म्हणाले. भाजपवाले आपल्याला शिव्या देवोत किंवा तोंडावर थुंकोत, आपण त्यांच्यासारखे न वागता अहिंसक मार्गाने त्यांना हरवू, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:17 PM 01-Mar-21