शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा; कंगना रनौतची याचिका

0

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेलने मुंबईतील तीन खटले हिमाचल प्रदेशात ट्रान्सफर करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तिन्ही खटले मुंबई-महाराष्ट्रातून हिमाचल प्रदेशला ट्रान्सफर करण्याची मागणी कंगना आणि तिच्या बहिणीने याचिकेत केली आहे. कंगना आणि रंगोली यांनी सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे, त्यांच्यावर मुंबईत तीन खटले सुरु आहेत. मात्र आपल्याला शिवसेना नेत्यांकडून धोका आहे. जर मुंबईत या खटल्याची सुनावणी झाली तर भडास काढण्यासाठी शिवसेना नेते टोकाची पावलं उचलू शकते, असं कंगनाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. कंगना आणि तिच्या बहिणीने वकील नीरज शेखर यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात स्थानांतरण याचिका दाखल केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:30 PM 02-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here