नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी एक चूक होती असं म्हटलं आहे. अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात भारताचे माजी मुख्य सल्लागार कौशिक बसु यांच्यासोबत व्हर्च्युअल चर्चेत राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं आहे. आणीबाणी चुकीची होती, माझ्या आजीनंही (इंदिरा गांधी) तसं म्हटलं होतं. पण त्यावेळी जे झालं आणि आज देशात जे होतंय या दोन्हीत फरक आहे. कारण काँग्रेस पक्षाने कधीही घटनात्मक संरचना बळकावण्याचा प्रयत्न केला नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:47 AM 03-Mar-21