तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना सुरू केली होती. त्यांनी राज्यात रावबलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, यासाठी विधीमंडळाची समिती स्थापन करण्यात येणार येणार असल्याची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत केली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तरात कोणताही घोळ नसल्याचं म्हटलं. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा आपल्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाहीये का असा सवालही केला. “सध्या ७५ टक्के वृक्ष जीवंत आहे. खरं तर ६० टक्क्यांचा दर अपेक्षित असतो. हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं आहे. त्यावरच आता हे लोकं समितीही स्थापन करणार. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर मंत्र्यांचा विश्वास नाहीये का?, किंवा मुख्यमंत्र्यांना याची माहितीच नाहीये का?,” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांना चुकीचं ब्रिफिंग होतंय का? मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिलं आहे. राजकीय आखाड्यासारखा या सभागृहाचा वापर केला. आम्हाला अडचण नाही. पण राजकीय आखाड्यासारखा उपयोग करणं योग्य नाही. फक्त तुमच्या मुख्यमंत्र्यांवर तुमचा विश्वास आहे की नाही हे सांगावं, असंही त्यांनी नमूद केलं.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:22 PM 03-Mar-21