मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत असून राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर, ४ फेब्रुवारी रोजी राज्यात तब्बल ८ हजार ९९८ नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात नव्या ६ हजार १३५ कोरोनाबाधित रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण २० लाख ४९ हजार ४८४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण ८५ हजार १४४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९३.६६% झाले आहे. दरम्यान, नागरिकांना कोरोनाविषयक सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:33 AM 05-Mar-21