कोकणात मोठय़ा प्रमाणात एलएडीचा वापर करून बेकायदा मासेमारी सुरू असल्यामुळे काही वर्षांनी मत्स्यदुष्काळ निर्माण होऊ शकतो. यामागे ट्रॉलर्स कंपन्या आणि मंत्रालयातील काही जणांचे साटेलोटे आहे. याला आळा घालण्यासाठी एलएडी मासेमारीविरोधात कायदा करा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेत करण्यात आली. विधान परिषदेत गुरुवारी पुरवण्या मागण्यांवेळी कोकणातील एलएडी मासेमारीचा विषय आमदार रामदास कदम यांनी मांडला. कोकणातील मासेमारीमुळे मत्स्यव्यवसाय धोक्यात आला असून याला सर्वस्वी ट्रॉलर्स कंपन्या आणि मत्स्य विभागातील अधिकारी यांचे साटेलोटे असल्याचा आरोप त्यांनी केला. खेड पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली असून त्यासाठी तातडीने 15 कोटींचा निधी मंजूर करावा, पशुवैद्यकीय डॉक्टरांची कमतरता आहे. त्यांची तातडीने नेमणूक करावी, दापोलीत 100 बेडच्या रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. मात्र त्यासाठी अद्याप निधी आलेला नाही. तो लवकर मिळावा, अशी मागणी रामदास कदम यांनी केली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:35 PM 05-Mar-21