राजापूर : केंद्र शासनाच्या नाणार येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनासाठी गेल्या चार पाच वर्षांत सुमारे ४ कोटी ३३ लाख ८ हजार रुपये खर्च केल्याचे जाहीर वक्तव्य रिफायनरी विरोधी समितीच्या एका प्रमुख नेत्याने केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. नाणार प्रकल्प विरोधासाठी कार्यरत असणाऱ्या एनजीओंची चौकशी करण्याची मागणी पुढे येत असताना हा खुलासा समोर आल्याने इतकी प्रचंड रक्कम आली कोठून, असा सवाल उपस्थित झाला असून, याची चौकशी करावी व हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच मार्गी लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:20 AM 06-Mar-21