मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत ८ मार्चला सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी होण्याआधी मराठा क्रांती मोर्चाला आपल्या काही भूमिका स्पष्ट करायच्या होत्या. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. जालना येथील साष्ठ पिंपळ गाव इथं ७ मार्चला मोठ्या आक्रोश सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा मोर्चाकडून देण्यात आली आहे. ‘या आक्रोश सभेसाठी राज्यभरातील मराठा समाजातील लोकांनी एकत्र यावे, मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार हे सर्वोच्च न्यायालयाचे कारण पुढे देत असले तरी गेल्या तीन वर्षात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याबाबत काहीच केले गेले नाही, शिवस्मारक बाबत काही केले गेले नाही. या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार किंवा सर्वोच्च न्यायालयाची गरज नाही,’ अशी रोखठोक भूमिका मराठा क्रांती मोर्चाकडून मांडण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:48 AM 06-Mar-21