मुंबई : कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहे. कोरोनावर मात करायची असेल तर मास्क एकमेव हत्यार असल्याचं देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. कोरोना काळात मास्क आवश्यक असल्याचं सरकार वारंवार सांगत असून देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आतापर्यंत मास्क लावलेला नाही. राज ठाकरे यांनी मास्क लावावा म्हणून राष्ट्रवादीते नेते क्लाईड कास्टो यांनी पत्र लिहिलं आहे. क्लाईड कास्टो पत्रात म्हणाले, ‘मी तुमचा चाहता आणि प्रशंसक आहे. हे खुले पत्र मी राजकीय पक्षातील संबंधित व्यक्ती म्हणून नव्हे, तर माझ्यासह तुमच्या अवती-भोवती वावरणाऱ्या सर्वसामान्यांची काळजी घेणारी व्यक्ती म्हणून लिहित आहे.’ असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना बाहेर असताना मास्क घालण्याची विनंती केली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:31 PM 08-Mar-21