रत्नागिरी : कोकणातील सुपरफास्ट नेटवर्क म्हणून ओळख असणाऱ्या रत्नागिरी खबरदारला गुणवत्तेच्या निकषानुसार आय. एस. ओ. मानांकन प्राप्त झालय. रविवार दिनांक ७ मार्च रोजी रत्नागिरीत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याची घोषणा केली. या कार्यक्रमासाठी मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेश शेळके देखील उपस्थित होते. आपल्या शुभेच्छापर भाषणात राजेश शेळके म्हणाले कि आपली बातमी खोटी ठरली नाही पाहिजे याची काळजी हेमंत वणजु यांच्याकडून नेहमीच घेतली जाते. कोणत्याही बातमीची दुसरी बाजू घेऊनच ती रत्नागिरी खबरदारला छापली जाते. सामजिक बांधिलकी जपताना आजवर अनेक गरजूंना whatsapp ग्रुपच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आलाय आणि हे कौतुकास्पद कार्य आहे. आज खबरदारला मिळालेले आय. एस. ओ. मानाकन म्हणजे याच कामाची पावती असल्याचे मत राजेश शेळके यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:45 PM 08/Mar/2021