चिपळूण : तालुक्यातील पेढांबे आंबाडीवाडी येथील किरकोळ कारणातून चौघांनी एकाला धक्काबुक्की केली आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ६ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबतची फिर्याद सुनील वरक यांनी दिली असून त्यानुसार बाबू विठ्ठल खरात, अनिल कोंडिबा खरात, संतोष विठ्ठल खरात, महेश कोंडिराम खरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. खरात व वरक कुटुंबात अनेक दिवस पायवाटेवरून वाद आहेत. वरक हे फ्रीज खरेदी करून अपे गाडीतून आणत असताना खरात कुटुंबियांनी त्यांची वाट अडवून पायवाटेवर मोठ्या दगडी टाकल्या व रस्ता अडवून वरक यांना शिवीगाळ केली. त्यानंतर अन्य दोघे या ठिकाणी आले व त्यांना मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:11 PM 08-Mar-21
