मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. सध्या त्यांना सातत्याने डोळ्यासमोर मुंबई महानगर पालिका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार दिसत आहे. त्यामुळे त्यांनी आरोप केला आहे की, महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प मुंबई महानगर पालिका डोळ्यासमोर ठेवून जाहीर करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात असंच काहीतरी केलं होतं, त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये अशा गोष्टी सातत्याने राहणार. त्यांना माझं सांगण आहे की, नागपूरचा समृद्धी महामार्ग, मंत्रालय, शासकीय इमारती आहेत, त्या महाविकास आघाडी सरकारने केल्या आहेत. असं काहीतरी करावं हे देवेंद्र फडणवीस यांना सुचलं नाही. ते या सरकारने ते करून दाखवलं, असल्याचे सांगत काँग्रेस नेते भाई जगताप यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:27 PM 09-Mar-21