विरोधकांच्या टीकेचा ना. उदय सामंतांनी घेतला समाचार

0

🔳 रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय होणार हि काळ्या दगडावरची रेघ : उदय सामंत

रत्नागिरी : राज्याचा अर्थसंकल्प सादर होताच रत्नागिरीला मेडिकल कॉलेज पासून वंचित ठेवलं असा आरोप विरोधकांनी केला होता. याचा समाचार आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला. ते म्हणाले कि विरोधक काय टीका करतात त्याच्याबद्दल मला काहीही घेणेदेणे नाही. माझं मत फक्त एवढेच आहे कि ज्या कुणी हा अर्थसंकल्प दिशाहीन आहे अशी टीका केली होती त्यांनी मी रत्नागिरीत आल्यावर माझ्या समोर बसावं व याबाबत संपूर्ण माहिती घ्यावी उगाच इकडे देवेंद्र फडणवीस बोलले म्हणून तिकडे बोलायलाच पाहिजे असं नाही. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत त्यांचे वाचन अफाट आहे त्यांच्यासारखं आम्ही काहीतरी करतोय हे करण्यासाठी रत्नागिरीत बसून काही बोलू नये. सर्व अभ्यास करून बोलणं हे गरजेचे आहे. वकील झाल्यानंतर जसं बार कौन्सिलच्या परवानगी शिवाय तिकडं काही होऊ शकत नाही तसेच मेडिकलच्या कौन्सिल समोर गेल्याशिवाय मेडिकल कॉलेज चा प्रस्ताव मंजूर होत नाही. मेडिकल कॉलेज रत्नागिरीत करून दाखवू हा विश्वास आम्हाला आहे. मात्र मेडिकल कॉलेज झाल्यानंतर ज्यांनी आज टीका केलेली आहे त्यांनी मेडिकल कॉलेज शिवसेनाच करू शकते हे कबूल कराव.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
04:48 PM 09/Mar/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here