मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडचणीत आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून उचलबांगडी करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, सचिन वाझे उत्तम तपास अधिकारी आहे. स्कॉर्पिओ गाडीचं प्रकरण फार मोठं नाही. अंबानींच्या जीवाएवढीच सामान्य आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या जीवाची किंमत आहे. विरोध पक्षाने फक्त राजीनामा आणि बदल्यांमध्ये रमू नये, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:26 PM 10-Mar-21
