राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला समर्थन दिले म्हणून वाडीतील काही ग्रामस्थांनी दमदाटी करून वाडीतून वाळीत टाकत जमातीमधूनही बहिकृत केल्याची तकार नाणार इंगळवाडी येथील अब्दुल मुनाफ सोलकर यांनी नाटे पोलिस ठाण्यात दिली आहे. राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला पूर्वीपासून आमच्या गावातील लोकांचा विरोध होता. मात्र, मी हा प्रकल्प व्हावा, अशा मताचा असून प्रकल्पाच्या समर्थनार्थ मुंबईत खा. सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी गेलो होतो. त्याचे फोटो वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर इंगळवाडी गावातील काहींनी १ मार्च रोजी मुजावर यांच्या मुलाच्या लग्नासाठी गेलो असता आपणाला दमदाटी केल्याचे तकारीत म्हटले आहे. यामुळे माझ्या कुटुंबीयांना धोका असल्याचे सोलकर यांनी म्हटले आहे
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:27 AM 11-Mar-21
