रत्नागिरी : तालुक्यातील रिळ गावामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच घरात घुसून गोठ्यातील गायीवर हल्ला करत बिबट्याने तिला ठार मारले. दररोज लोकांच्या पाळीव कुत्र्यांवरही बिबट्या हल्ले करत आहे. या सर्व घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात बिबट्याची दहशत असून वनविभागाने तात्काळ बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:15 PM 11-Mar-21
