नवी दिल्ली : दिल्लीहून देहरादूनला निघालेल्या शताब्दी एक्सप्रेसच्या एका डब्यानं अचानक पेट घेतल्यानं प्रवाशांची एकच भंबेरी उडाली. शताब्दी एक्सप्रेसच्या सी – ५ डब्याला ही आगा लागली होती. परंतु, या आगीत कोणत्याही प्रवाशाला नुकसान झालेलं नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय.
उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसाार, शताब्दी एक्सप्रेसच्या ज्या बोगीत आग लागली होती. त्या डब्यातून सर्व प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं. कोणत्याही प्रवाशाला कोणत्याही प्रकारे हानी या अपघातामुळे झालेली नाही. दिल्लीहून देहरादूनला निघालेल्या ०२०१७ अप शताब्दी एक्सप्रेस रेल्वेमध्ये हरिद्वारनजिक कंसरो स्टेशनजवळ आग लागली. आगीनं अगदी थोड्या वेळातच भयानक रुप धारण केलं. सी ५ डब्यातून आगीच्या मोठमोठ्या ज्वाला बाहेर पडलेल्या दिसू लागल्या. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राईवाला आणि कसंरो रेल्वे स्टेशनदरम्यान दुपारी १२.०० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत प्रवाशांना हानी पोहचलेली नाही. रेल्वेत आग लागल्याची सूचना मिळाल्यानंतर तातडीनं रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. फायर ब्रिगेडला कळवण्यात आलं. फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनी रेल्वेत लागलेल्या आगीवर फारच कमी वेळेत नियंत्रण मिळवलं. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या डब्याला आग लागली होती तो डबा रेल्वेपासून वेगळा करण्यात आला. या डब्यातील प्रवाशांना दुसऱ्या डब्यात जागा देण्यात आली आणि रेल्वेला पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आलं. आग लागलेल्या डब्यात एकूण ३५ प्रवासी होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:31 PM 13-Mar-21