मुंबई : सध्या राज्यात, मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्याचा कारभार ज्या मंत्रालयात चालतो त्या मंत्रालयातील मंत्री, कर्मचारी देखील कोरोनाबाधित झाले आहेत. अशा वेळी राज्यातील जलसंधारण विभागाने एक वेगळं पाऊल उचलले आहे. ते म्हणजे मंत्रालयात त्या विभागात दोन शिफ्टमध्ये कामकाज करण्यात येणार आहे.
जलसंधारण विभागाने सकाळी ८ ते दुपारी ४ आणि दुपारी बारा ते रात्री आठ अशी शिफ्ट केलेल्या आहेत. यामध्ये विभागातील कर्मचाऱ्यांना वाटून शिफ्ट देण्यात आल्या आहेत. यामध्ये एका कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होम करण्याची देखील मुभा देण्यात आली आहे. मंत्रालयात येणारे कर्मचारी यांना लोकल ट्रेन बस मधून प्रवास करावा लागतो. त्या गर्दीत ही कोरोना धोका कायम आहे. एकाचवेळी अनेक कर्मचारी असण्यापेक्षा दोन शिफ्ट मध्ये कर्मचारी विभागून जलसंधारण विभागाने एक प्रयत्न केला आहे. १५ मार्चपासून या दोन शिफ्ट मध्ये कामकाज चालणार आहे. यामुळे कामावर काही परिणाम होतो का हे देखील पाहावं लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलून काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण मंत्रालयात पहिल्यांदाच अशा पद्धतीने शिफ्ट मध्ये काम करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर इतर विभागातही शिफ्ट मध्ये काम करता येईल का हा विचार करण्यात येणार आहे. पण सुरुवात सध्या तरी जलसंधारण विभागाने केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:59 PM 13-Mar-21