मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण ते मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण यावरून गेल्या काही दिवसांत भाजपने महाविकासआघाडीची पुरती कोंडी केली आहे. एकामागोमाग एक आव्हाने देत भाजप ठाकरे सरकारला अडचणीत आणत आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजप नेते नारायण देखील पुढे सरसावले आहेत. ‘महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी’, अशी मागणी नारायण राणे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. दिल्लीत ३ दिवसांपूर्वीच अमित शहा यांना पत्र लिहून आपण ही मागणी केल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:27 PM 15-Mar-21
