मुंबई : सचिन वाझे प्रकरणी ठाकरे सरकारच्या अडचणी संपताना दिसत नाहीयत. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या काही तास बैठक चालली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मुख्यमंत्र्यांच्या भेट घेत आहेत. वाझे प्रकरणी ठाकरे सरकारची चांगलीच अडचण झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री बदललं जाण्याची जोरदार चर्चा आहे. अनिल देशमुख यांच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या नेत्याकडे हे खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तर दुसरीकडे गृहमंत्री बदलण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे राज्याला नवा गृहमंत्री मिळणार की मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी होणार? हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:08 PM 15-Mar-21