”तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येताहेत म्हणून राज्यात कोरोना वाढतोय का?”

0

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे अनेक भागांत पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. काही भागांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय, असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी उपस्थित केला आहे. ‘महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इथे कोरोना वाढत नाही. कोरोनाच महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारचं कोरोनावर प्रेम आहे? की स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि कोरोनाचा वापर होतोय?’, असे प्रश्न देशपांडेंनी ट्विट करून विचारले आहेत. राज्य सरकारकडून जनतेला कोरोनाची नाहक भीती दाखवली जात असल्याचा आरोप मनसेकडून अनेकदा करण्यात आला आहे. तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येत आहेत, म्हणून कोरोना वाढतोय का? महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये कोरोना नाही. मग महाराष्ट्रातच तो कसा वाढतोय? सरकारचं कोरोनावर प्रेम आहे की कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती मनसेनं राज्य सरकारवर केली आहे. सरकार एवढे कडक निर्बंध लावत असेल, तर जनतेला काही सवलती देणार का? असाही प्रश्न मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:36 PM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here