सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ४२२ नळयोजना कामांसाठी जलजीवन योजनेंतर्गत सुमारे २०२ कोटीच्या आराखड्याला पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी सिधुदुर्ग जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील ८ गावे आणि ६२६ वाड्याचा समावेश असलेला ६ कोटी ४० लाख ४७ हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. शासनाच्या जलजीवन योजनेंतर्गत जिल्ह्यातील २९४ महसूल गावातील लाभार्थीना वैयक्तिक नळ जोडणी करणे, १५८ ठिकाणी नवीन नळपाणी योजना तयार करणे, ज्या शाळांना आणि अंगणवाड्याना नळाद्वारे पाणी नाही अशा १८५ शाळा आणि ३८२ अंगणवाड्याना नळाद्वारे पाणी देणे अशा एकूण २०२ कोटीच्या ४२२ कामांना पालकमंत्री उदय सामंत याची मंजुरी दिली आहे. पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी हि माहिती दिली
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:18 PM 17-Mar-21